अवकाळी पावसाचा फटका; थंडीत गारठून २५ मेंढ्यांचा मृतू
नाशिक: सिन्नर तालुक्यातील जायगाव परिसरात थंडीत गारठून २५ मेंढ्यांचा दुर्दैवी मृतू झाला असून मेंढपाळ नंदू पुंडलिक वाणले यांचे लाखांचे नुकसान झाले आहे. बुधवार १ नोव्हेंबर रोजी वाणले यांनी आपल्या मेंढया गायकवाड यांच्या मळ्यात बसवल्या होत्या. जोरदार पासून व त्यातच कडाक्याची थंडी असल्याने मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला. घटनेची माहिती समजताच वन विभागाच्या अधिकार्यानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. नंदू वाणले यांना मेंढया हे एकमेव उतपन्नाचे साधन आहे. शासनाने त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/