सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार नामांकनासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत
मुंबई : सरदार पटेल राष्ट्रीय पुरस्कार नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२१ आहे. देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने काम करणार्या व्यक्तिसाठी हा पुरस्कार आहे.
या पुरस्कारासाठी कोणताही भारतीय नागरिक आणि भारतामधील संस्था व संघटना या https://nationalunityawards.mha.gov.in साईट वर ऑनलाइन नामांकन करु शकतात. पुरस्कारासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या या पोर्टलवरच आपली नामांकने दाखल करायची आहेत. या पोर्टलवर दिलेल्या विहित नमुन्यात, राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने केलेल्या विशेष कार्याची तसेच आवश्यक इतर सर्व माहितीसह नामांकन सादर करणे आवश्यक आहे.
देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थेस त्यांनी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ हा पुरस्कार दिला जातो . हा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.